
काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार एकता समर्थ ठरतायत ‘गेम चेंजर’ !
मूल नगर परिषद निवडणुकीत राजकीय तापमान चढत असताना यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक दबाव सत्ताधारी भाजप आणि स्थानिक आमदारांवर येताना दिसत आहे. मतदारांचा कल वेगाने बदलत असून काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार एकता प्रशांत समर्थ यांच्या प्रचाराला अपेक्षेपेक्षा मोठा प्रतिसाद मिळत आहे. परिणामतः आमदाराला चांगलाच घामगाळावा लागत असल्याचे चित्र आहे.
शहरातील मतदारांनी व्यक्त केलेली नाराजी, वाढते स्थानिक प्रश्न आणि भाजपच्या तिकीट निवडीतील गोंधळ या सर्वांचा परिणाम काँग्रेसच्या बाजूने झुकताना दिसतो आहे. त्यामुळेच सध्या आमदारांना प्रचारात जोर वाढवावा लागत असून प्रत्यक्ष जनसंपर्कात उतरावे लागत आहे.
शांत स्वभाव, स्पष्ट व्हिजन आणि भक्कम जनसंपर्क काँग्रेसच्या उमेदवार एकता समर्थ या शांत, संयमी स्वभावाच्या म्हणून ओळखल्या जातात. गेल्या काही वर्षांत त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांद्वारे महिलांमध्ये, युवकांत आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भक्कम विश्वास निर्माण केला आहे.
भाजपची उमेदवारी निवड गोंधळात; मतदारांमध्ये नाराजी वाढली
भाजपने तिकीट निवडीत अखेरच्या क्षणी केलेल्या उलटफेरीमुळे शहरात असंतोष निर्माण झाला आहे. डमी उमेदवार, सर्वेक्षणाचा दावा, आणि उमेदवारीत केलेला अचानक बदल या सर्वामुळे मतदारांमध्ये निर्माण झालेला गोंधळ अद्याप कमी झालेले नाही.याचा थेट राजकीय फायदा काँग्रेसकडे झुकताना दिसत आहे.
भाजपकडून सुरळीत नेतृत्व दिसत नसल्याची चर्चा शहरभर आहे, आणि यामुळेच आमदारांना प्रत्यक्ष मतदारांमध्ये जाऊन स्पष्टीकरण द्यावे लागत असल्याचे चित्र दिसते.
शहरातील तरुण मतदार, महिलांचा वाढता सहभाग आणि स्थानिक प्रश्नांना तातडीचे समाधान हवे असल्याची भावना—या सर्वांनी परिवर्तनाची हवा अधिक वेगाने वाहू लागली आहे.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घराघरात केलेला प्रचार, एकता समर्थ यांची सकारात्मक प्रतिमा आणि स्थानिक पातळीवरील असंतोष या मिश्र परिणामामुळे त्यांची ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

गेल्या अनेक वर्षापासून एकहाती सत्ता असल्याने जनता कंटाळली आहे. त्यामुळे आता बदल हवा अशी जनमानसात चर्चा सुरू झाली आहे. राकेश रत्नावार हाच बदल घडून आणण्यासाठी मूळ शहरात दिसत आहेत. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने नगर परिषद मूल च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या वचन नाम्यात सत्ता हाती येताच पूर्तता करण्याचा मनोदय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे एकूण प्रचार पाहता नगराधक्षसह उमेदवारासह राकेश रत्नावार , प्रशांत समर्थ , अतुल गोवर्धन, सौ समीक्षाताई कडस्कर, व उज्वला कामडी व सोबतीचे अनेक नगरसेवक निवडून येणार असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

